Balasore Train Accident : अत्यंत महत्वाचे व माहितीपूर्ण फक्त 35 पैशात मिळतो रेल्वे पॅसेंजर ला 10 लाखांचा इन्शुरन्स आपल्याला माहीत आहे का ?
Balasore Train Accident : |
ओरिसातील बालासोर रेल्वे अपघात हा गेल्या काही वर्षातील खुप मोठा आणि भीषण अपघात आहे. जवळपास 290 व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर 900 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत यातील काही लोक कायमचे अपंग झाले आहेत.ज्यांच्या L I C पाॅलिसीज होत्या त्यांच्या वारसांना त्वरित क्लेम देण्यासाठी L I C ने विषेश व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत विम्याचे पैसे कुटुंबातील व्यक्तिना फार मोठा आधार असतो.
L I C पाॅलीसी विमा मोठा
गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही कितीही पैशानी त्या व्यक्तीची भरपाई होवू शकत नाही परंतु कमावती व्यक्ती मृत पावली तर विमा मोठाच आधार ठरतो. परंतु सगळेच लोक L I C पाॅलीसी घेतात असे नाही म्हणून लाबंचा रेल्वे प्रवास करताना IRTC मधून ऑनलाइन टिकिट बुक करताना तुम्हाला *फक्त 35 पैशात 10 लाखांचा विमा* मिळतो .टिकिट फाॅर्म भरताना विम्याच्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला नाॅमिनी डिटेल्स विचारले जातात व नाॅमिनी माहीती व फक्त 35 पैसे प्रिमियम ॲड झाला की तुम्हाला रेल्वे प्रवासात 10 लाखांचा इन्शुरन्स मिळतो.
जर रेल्वे प्रवासात पॅसेंजर चा मृत्यू झाला तर किंवा पुर्ण अपंगत्व आले तर 100% रक्कम नुकसान भरपाई म्हणजेच 10 लाख रूपये दिले जातात.कायमच अंशिक अपगत्व आल तर 7.50 लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.आणि पॅसेंजर जखमी झाला तर 2 लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.म्हणून रेल्वे प्रवासात IRTC रेल्वे टिकिट बुकिंग करताना 35 पैशात मिळणारा 10 लाखांचा इन्शुरन्स ऑप्शन वर क्लिक करून सर्व माहिती भरा.जर अपघात झालाच तर वारसदार व्यक्ती ला संबधित विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन क्लेम फाॅर्म भरून नुकसान भरपाई मिळवता येते.
हि महत्वाची माहिती आपण संग्रही ठेवा व पुढे फाॅरवर्ड करा.